सिडनी : भारत-आॅस्ट्रेलिया दरम्यानच्या लढतीने आज सातव्या महिला टी-२० विश्वचषकाची सुरूवात होत आहे. चारवेळा विजेतेपद पटकाविणा-या आॅस्ट्रेलिया संघास विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे तर कुठल्याही संघाला नमविण्याची धमक भारतीय संघात असल्याने आॅस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय संघासही दावेदार मानले जात आहे.
भारत-आॅस्ट्रेलिया सामन्यास थोड्याच वेळात सिडनी येथील शोग्राउंड स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, नाणेफेकीचा (टाॅस) झालेला कौल आॅस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आहे. आॅस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फंलदाजीस पाचारण केलं आहे.
Australia have won the toss and chosen to bowl at the Sydney Showground!
Good decision? 🤔#AUSvIND | #T20WorldCup pic.twitter.com/3A5Ngbxy6X
— T20 World Cup (@T20WorldCup) February 21, 2020
दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-आॅस्ट्रेलिया तीनदा आमनेसामने आले असून यात दोनवेळा आॅस्ट्रेलियाने तर एक वेळा भारताने बाजी मारली आहे.