यंदाचा टी २० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. यजमान म्हणून ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे आणि संघ गतविजेताही आहे. 2021 मध्ये यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.
यंदाच्या T20 वर्ल्डकपमध्ये 10 मोठे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. पहिला सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. सध्या श्रीलंकेचा महेला जयवर्धने १०१६ धावांसह अव्वल स्थानावर आहे. 1000 धावा पूर्ण करणारा तो एकमेव खेळाडू आहे. यावेळी रोहित शर्मा (847) आणि विराट कोहली (845) जयवर्धनेला मागे टाकू शकतात.
वेस्ट इंडिजने दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. अशा स्थितीत हे संघ विंडीजशी बरोबरी करू शकतात. त्यासाठी त्यांना आपली कामगिरी सुधारून शेवटपर्यँत अपराजित रहावे लागेल.
वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने सर्वाधिक 2 शतके झळकावली आहेत. याशिवाय 7 फलंदाजांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. भारताचा माजी दिग्गज सुरेश रैनानेही शतक झळकावले आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने विश्वचषकात शतक झळकावले आहे. अशा स्थितीत यंदा गेलचा विक्रम तोडण्याचे आव्हान फलंदाजांवर असणार आहे.
श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने T20 विश्वचषकात 111 चौकार मारले आहेत. भारताच्या रोहित शर्मा 80, डेव्हिड वॉर्नर 80 आणि माजी कर्णधार विराट कोहलीने 78 चौकार मारले आहेत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा जयवर्धनेवर असतील. त्यातच चौकारांचे हे रेकॉर्ड नेमकं कोण तोडणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असेल.
ख्रिस गेलने T20 वर्ल्ड कपमध्ये 63 षटकार ठोकले आहेत. इतर कोणत्याही फलंदाजाला ५० षटकारांचा टप्पा गाठता आलेला नाही. भारताकडून रोहित शर्माने 31 षटकार तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनेही 31 षटकार मारले आहेत. अशा स्थितीत दोघांच्या नजरा गेलच्या विक्रमावर असतील.
T20 विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी 27 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने 24 तर भारताने 23 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत या संघांना श्रीलंकेला मागे सोडायचे आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनेही 22-22 सामने जिंकले आहेत. अशात कोणता देश याबाबतचे नवीन रेकॉर्ड बनवेल यावर देखील सगळ्याच्या नजरा असतील.
विश्वचषकात धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. त्यांनी 2007 मध्ये केनियाचा 172 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, विकेट्सच्या बाबतीत, 4 संघ ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, ओमान आणि दक्षिण आफ्रिका यांनी 10 विकेट्सने मोठा विजय नोंदवला. हे रेकॉर्डही यंदाच्या सिजनमध्ये मोडले जाऊ शकतात.
T20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम बांगलादेशच्या शाकिब अल हसनच्या नावावर आहे. त्याने 41 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत तो 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरू शकतो. भारताकडून आर अश्विनने 26 विकेट घेतल्या आहेत. अशात हे रेकॉर्ड तोडणं अवघड असलं तरी क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकते.
T20 विश्वचषकात फक्त एकाच गोलंदाजाला 6 विकेट घेता आल्या आहेत. श्रीलंकेचा ऑफस्पिनर अजंथा मेंडिसने 2012 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याने 8 धावांत 6 विकेट्स घेतल्या. हे रोकॉर्ड तोडण्यासाठी गोलंदाजांना जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत या विक्रमाकडे अनेक गोलंदाजांच्या नजरा असतील.