अबुधाबी – मुंबई इंडियन्सचा अनुभवी लेग स्पीन गोलंदाज पियुष चावलाने एक अनोखी कामगिरी केली आहे. त्याने अमित मिश्राच्या 262 बळींच्या कामगिरीला मागे टाकताना 263 बळींची नोंद केली.
या कामगिरीच्या जोरावर तो टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. चावलाने मुंबई इंडियन्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादच्या महंमद नबीला बाद केले तेव्हा तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.
त्याने आयपीएलसह जगभरातील विविध संघांतून मिळून एकूण 250 टी-20 सामने खेळले असून त्याने 263 बळी मिळवले आहेत.