दुबई – करोनाचा धोका असताना तसेच काहीसा कमी झाल्यानंतरही गेल्या दीड वर्षांपासून विविध मालिका तसेच स्पर्धांसाठी क्रिकेटपटू बायोबबल सुरक्षेत राहात आहेत. त्यामुळे काही खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम झाल्याचे समोर आले.
त्यामुळे येत्या 19 ऑक्टोबरपासून अमिराती व ओमानमध्ये सुरु होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी एका मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती आयसीसी करणार आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून जगभरात विविध देशांनी क्रिकेट मालिका तसेच दौरे केले.
यावेळी अनेक क्रिकेटपटूंनी अचानक माघार घेतल्याच्या घटनाही घडल्या. या घटना केवळ सातत्याने बायोबबलमध्ये राहिल्यामुळे आलेल्या मानसिक नैराश्यामुळेच घडल्याचेही स्पष्ट होत आहे.
त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत असे काही घडू नये यासाठीच हा निर्णय घेतल्याचे आसीसीने स्पष्ट केले आहे.