पेठ (वार्ताहार) – उन्हाळ्यात आपल्या पशुधनाच्या निवाऱ्यासाठी सातगाव पठार भागातील शेतकरी पारंपरिक पारंपारिक पद्धतीने आकर्षक मांडव तयार करत आहे. पेठ येथील बैलगाडा मालक शेतकरी दिलीप म्हातारबा पवळे यांच्या शेतात अगदी ऐतिहासिक किल्ल्याचे बांधकाम असते तसेच आकर्षक मांडव आपल्या शेतामध्ये तयार करून बैलगाडा स्पर्धेतील बैलावरील आपले प्रेम व्यक्त केले आहे.
पेठ येथील शेतकरी दिलीप म्हातारबा पवळे यांनी आपल्या शेतात बैलांच्या मांडवाचे रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे केली आहे. यावर्षी त्यांनी रायगडाची मेघडंबरी हा देखावा उभारला आहे. येथे भेट देणाऱ्या अनेकांना हा मांडव नसून एक किल्लाच आहे असा भास झाला तर यात नवल काय. ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्या पासून तयार करण्यात आलेल्या या मांडवाला पाहण्यासाठी अनेक भागातून लोक आवर्जून येत असतात.
सातगाव पठार भागातील म्हणजेच पेठ, पारगाव, भावडी, कारेगाव, कुरवंडी, थुगाव, कोल्हारवाडी या गावांमध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या पशुधनासाठी शेतांमध्ये आजही कडब्याच्या पेंढ्या पासून मांडव तयार केला जातो. ज्वारी काढणी संपल्यानंतर कडब्याच्या पेंढ्या पासून मांडव तयार केला जातो. उन्हापासून आपल्या जनावरांचे संरक्षण व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो .आपल्या मुक्या प्राण्यांना बळीराजा किती जीव लावतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी घातली असली तरी बळीराजाचे बैलावरील आपले प्रेम अजूनही कमी झालेले नाही हे हे यातून दिसून येते. बैलगाडा शर्यती वरील बंदी उठेल तेव्हा उठेल त्याची चिंता न करता आपल्या मांडव रुपी किल्ल्याच्या प्रथमदर्शनी भाले, ढाली,तलवारी आदी वस्तू लावलेले आहेत. बैलगाडा शर्यत सुरू असताना त्यांना मिळालेली प्रशस्तीपत्रक देखील मांडवाच्या प्रथमदर्शनी लावलेली दिसतात. रायगडाची मेघडंबरी ही प्रतिमा उभारत असताना शिवपुतळा भगवा ध्वजा सहित दिसत आहे .हा बैलांना बांधण्यासाठी मांडव प्रतिकृती उभारणे कमी मुलगा शिवाजी, मुलगी पौर्णिमा, मित्रमंडळी, आणि वस्तीवरील सहकारी यांची मोलाची साथ लाभली आहे. ५० ×२० फुटी मांडव . ज्वारी कडब्याचा व बांबु पासुन बनवला असुन साधारण अडीच महिने बनविण्यासाठी लागले. ५ बैल व १ घोडी साठी मांडव गेल्या कित्येक वर्षांपासून बनवत आहोत.
शर्यत बंदी झाल्यानंतर देखील शेतकरी आपल्या बैलावरील प्रेमात तूस भरही कमी पडले नाहीत. बैलांच्या संगोपन करणे हे अत्यंत खर्चिक काम असते. असे असून सुद्धा सातगाव पठार भागातील बळीराजा जनावरांची विशेष काळजी घेतात. बैलगाडा स्पर्धेतील बैलांना सावलीसाठी तयार केलेला मांडव आणि त्याची किल्ल्यासारखे खालची कलाकुसर म्हणजेच हा मांडव व त्यावर फडकत असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हीच खरी मुख्य जणांसाठी प्रेमाची व पशुधनासाठी केलेली जोपासना.
शिवाजी दिलीप पवळे, युवा शेतकरी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मांडवाला किल्ल्याचा आकार देण्याचा प्रयत्न करतो. तसेच गेली सात वर्ष बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. स्वयंघोषित प्राणीमित्रानी बैलगाडा शर्यत न्यायप्रविष्ट केलेली आहे. आणि प्राणीमित्रांच्या म्हणण्यानुसार शेतकरी बैलांचा छळ करतो. त्यांनी अशी सेवा करणारे शेतकरी पहावेत. तामिळनाडू राज्यातील जलीकट्टू शर्यतीवरील बंदी अवघ्या सात दिवसात उठू शकते. तर महाराष्ट्र बैलगाडा शर्यत बंदी केवळ राजकीय उदासीनतेमुळे अनेक वर्षे उठू शकलेली नाही.
दिलीप म्हतारबा पवळे, बैलगाडा मालक पेठ.