श्रीरामपूर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदार संघातून २०१४ ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेने मध्ये प्रवेश केला आहे. आणि आता त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे ज्यांच्या विरोधात आज पर्यंत काम केलं त्यांच्यासाठी जनतेकडे मतदान कस मागणार हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा राहिल्याने. आम्ही कांबळेंचा प्रचार करणार नसल्यची भूमिका मतदार संघातील सर्व शिवसेना शाखा प्रमुखानी घेतली आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरुये. काही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. तर काहीं पक्ष यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय मंडळींनी सत्ताधारी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. परंतु या आयारामांमुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी आयारामांच्या विरोधात भूमिका घेतल्या आहेत.
दरम्यान श्रीरामपूर मधील 48 शाखा प्रमुखांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना पात्र पठवले आहे. या पत्रामध्ये आम्ही कांबळेच्या विरोधातच प्रचार करणार असल्याचे शाखा प्रमुखांनी म्हटल आहे. जर श्रीरामपूर मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर उमेदवार बदलून देण्याची मागणीही करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत सदाशीव लोखंडेचा प्रचार करतांना कांबळेंचा निष्क्रीयपणा मतदारा समोर मांडला आता पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कोणत्या तोंडांनी मते मागायची हा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.