…तर तीन जिल्ह्यातून होणार हद्दपार
हद्दपारी केलेले गुन्हेगार जिल्ह्याच्या लगत असलेल्या गावात वास्तव्यास राहतात. त्यामुळे या गुन्हेगारांपासून शेजारील जिल्हात धोका असेल तर नगर जिल्हासह शेजारील तीन जिल्हातून दोन वर्षासाठी हद्दपार होऊ शकते. त्यामुळे दोन वर्षांसाठी जिल्हातून हद्दपार केला जणाऱ्या 50 व्यक्तीविरोधात उपविभागीय कार्यकारी अधिकारी निर्यण घेऊ शकतात.
नगर – वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वेगवेगळ्या गुन्हात हात असलेल्या व शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बांधा पोहचवणारे सुमारे 50 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जिल्हातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून, याबाबत लवकरच प्रक्रीया पूर्ण होणार असल्याचे शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.
शहरातील कोतवाली, भिंगार कॅम्प, तोफखाना, एमआयडीसी व तालुका पोलीस ठाणे हद्दीतील संघटीत गुन्हेगारी असलेले, दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले व एखाद्या गुन्ह्यात शिक्षा भोगल्यानंतरही पुन्हा गुन्हे करणाऱ्या सुमारे 50 गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार केले जाणार आहे. गेल्या सहा महिन्यापासून लोकसभा, विधानसभा व गणेशोत्सव काळात अनके व्यक्तीनां जिल्हातून काही काळासाठी हद्दपार करण्यात आले होते. परंतु, आता दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 50 व्यक्तीविरोधात ही कारवाई केली जाणार आहे.
याबाबत शहरातील पाचही पोलीस ठाण्यातून प्रस्ताव तयार करून उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. यावर लवकरच शिक्का मोहर्त होणार असणाचे समजते. गेल्या तीन ते चार महिन्यापासून गुन्हेगारी व्यक्तीविरोधात एमपीडीएची कारवाई केली जात आहे. अजूनही अनेक व्यक्तीविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी शहर पोलिसांनी हद्दपारीचे कारवाई करण्याचे पाऊल उचल्याने गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे.मात्र पोलीसांचे लागेबंध यात आड येत असल्याची चर्चा आहे.