सातारा -15 ऑगस्ट रोजी 144 कलम लागू करण्यात आले असून जिलेबी किंवा मिठाईचे उत्पादन, विक्री व वाटप करण्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र मिठाईचे खास करुन जिलेबीचे वाटप केले जाते.
या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर करोनाचा संसर्ग होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यामध्ये कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटपास दि. 15 ऑगस्ट रोजी मनाई केली आहे.