स्वरा भास्कर आपल्या सिनेमापेक्षा आपल्या वादग्रस्त ट्विटमुळेच अधिक चर्चेत असते. आता तिने असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यामुळे पब्लिकने तिची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. तिचे ट्विट आणि त्यावर नेटिझन्सनी केलेल्या कॉमेंट बघितल्या की असे वाटते की लोक स्वराच्या एखाद्या वादग्रस्त ट्विटची वाटच बघत बसले होते की काय.
स्वराने आता केलेले ट्विट मुगलांच्या संदर्भातले आहे. मुगलांनी भारत् देशाला समृद्ध केले. देशातील संपत्ती विदेशात न्यायला ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली, असे तिने म्हटले होते. तिच्या या ट्विटमध्ये इतिहासाचा अभ्यास अजिबातच नव्हता, हे तर उघड आहे. तिला अनेकांनी इतिहास तपासून बघायला सांगितले आहे. तर काही जणांनी तिला पाकिस्तानला निघून जायचा सल्ला दिला आहे. एवढेच नव्हे तर स्वराला ट्रोल होण्याचा छंद जडला आहे. ती मुद्दाम ट्रोलरना आमंत्रित करत असते, अशी टीकाही एकाने केली आहे.
यापूर्वीही स्वरा अनेकवेळा आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे अडचणीत आली आहे. ट्विटरवरच्या प्रत्येक हॅशटॅग कॅम्पेनमध्ये ती सहभागी होत असते. आताच्या आपल्या ट्विटवर झालेल्या ट्रोलिंगवरून मात्र तिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.