मुंबई – स्वरा भास्कर ही अशी एक अभिनेत्री आहे जी आपल्या मनातली गोष्ट अगदी बिनधास्तपणे बोलते. लोकांची पर्वा न करता ती आपले म्हणणे बिनधास्तपणे मांडते. म्हणूनच स्वराच्या चित्रपटांपेक्षा तिची विधाने जास्त चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा स्वराने असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी तिने शाहरुख खानवर मोठा आरोप केला आहे. एका मुलाखतीत स्वराने आरोप केला आहे की, शाहरुख खानने तिचे लव्ह लाईफ उद्ध्वस्त केले आहे.
एका इंग्रजी माध्यमाशी संवाद साधताना स्वरा भास्कर म्हणाली, ‘माझं लव्ह लाईफ उध्वस्त करण्यासाठी मी आदित्य चोप्रा सर आणि शाहरुख खानला जबाबदार धरते. शाहरुखचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट मी तरुण वयात पाहिला आणि तेव्हापासून मी त्या ‘राज’च्या शोधात होती जो हुबेहूब शाहरुखसारखा दिसतो अशी टिप्पणी स्वराने यावेळी केली. ती पुढे म्हणते, खऱ्या आयुष्यात राज नसतोच मुळात हे समजायला मला बरीच वर्षे लागली. त्यामुळे मी रिलेशनशिपमध्ये फारशी चांगला नाही. सिंगल लाईफ कठीण आहे आणि जोडीदार शोधणे म्हणजे कचऱ्याची छाननी करण्यासारखे आहे. असं स्पष्ट मत स्वराने मुलाखतीदरम्यन व्यक्त केलं.
स्वरा भास्क लवकरच ‘जहां चार यार’ चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान स्वराने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटावरून शाहरुखसह आदित्य चोप्रावर विनोदी शैलीत भाष्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय ‘मिसेस फलानी’ या आगामी चित्रपटात स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.