कोल्हापूर – पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रोश पूरग्रस्तांचा. परिक्रमा पंचगंगेची हे आंदोलन आजपासून सुरू केल आहे.
कोल्हापूरची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात अभिषेक, पूजा करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्यासाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीकडे जाण्यासाठी पायी यात्रा सुरू केली आहे.
सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांच्या कडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगेची परिक्रमा करायला लागत आहे. पोटातली आग डोक्यात गेल्यावर ती काय होतं हे या परिक्रमेतून सरकारला सांगत आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही सरकारने तात्काळ 2019 धरतीवरती जीआर काढावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.