कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी संपूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. प्रदेश पातळीपासून गाव पातळीवरील सर्व पदे बरखास्त केली आहेत. नव्याने कार्यकारिणीची बांधणी करणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोलापूरमधील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची दोन वर्षासाठी एकाचवेळी नेमणूक करण्यात येणार आहे. विभागीय राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत होणार आहेत. देश ते गाव पातळीवरील पदे निवडीचा कार्यक्रम पुढील महिनाभरात पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.