पुणे – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उचरक्तदाबाची समस्या जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेट्टी यांनी गेल्या महिन्यात कोरोना बाधा झाल्यानंतर शहरातील याच रुग्णालयात उपचार घेतले होते. यानंतर आठवडाभरात त्यांची प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला होता.
अशातच त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शेट्टी यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
कोरोनातून बरे झाल्यानंतर शेट्टी हे शेतकरी प्रश्न घेऊन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यभर दौरे करतानाही दिसले.