नवी दिल्ली – मागील अधिवेशनात महाराष्ट्रातील विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती आता लोकसभेत झाल्याचं पाहिलं मिळालं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरुन विरोधी पक्षाच्या १२ खासदारांचे संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे.
दरम्यान निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे.
या कारवाईचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला असून पाच खासदारांना निलंबनाला सामोरं जावं लागलं. राज्यसभेच्या सदस्यांच्या वर्तवणूकीसंदर्भातील नियमांमधील नियम क्रमांक २५६ नुसार १२ खासदारांचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान निलंबनानंतर काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा यांनी सरकारवर हल्लाबोल करताना खासदारांचे निलंबन लोकशाहीविरोधी आहे. ही लोकशाही आणि संविधानाची हत्या आहे. राज्यसभा अध्यक्षांचा निर्णय एकतर्फी असून आम्हाला आमची बाजू देखील मांडण्याची संधी दिली नसल्याचं त्यांनी म्हटलं.
निलंबित खासादारांची नावे
प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
अनिल देसाई (शिवसेना)
फुलो देव निताम (काँग्रेस)
छाया वर्मा (काँग्रेस)
रिपून बोरा (काँग्रेस)
सय्यद नसीर हुसैन (काँग्रेस)
अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)
राजमणी पटेल (काँग्रेस)
डोला सेन (तृणमूल काँग्रेस)
शांता छेत्री (तृणमूल काँग्रेस)
एल्लामारम करीम (सीपीएम)
बिनोय विश्मव (सीपीआय)