नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे दोन दिवंगत नेते अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
अरून जेटली हे व्यवसायने वकील होते. त्यांनी देशाच्या अर्थमंत्री धुरा मोदी यांच्या पहिल्या मंत्रीमंडळाच्या काळात सांभाळली होती. भारतीय जनता पक्षावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणाऱ्या आरोपांना ते आपल्या अतुलनीय युक्तीवादाने तोंड देत असत. त्यांनी नोटाबंदीच्या काळातही सरकारचे जोरदार समर्थन केले होते.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या म्हणून धुरा सांभाळली होती. पक्षात त्या लालकृष्ण अडवाणी यांच्या समर्थक मानल्या जात असत. त्यांनी परराष्ट्र व्यवहार यासारख्या रूक्ष वाटणाऱ्या खात्याला मानवी संवेदनशील चेहरा मिळवून दिला होता..