मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ‘संदीप देशपांडे’ यांच्यावर हल्ला आहे. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. आणि संदीप देशपांडे यांना स्टम्पने मारहाण केली असून, या हल्ल्यात देशपांडे त्यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही.
दरम्यान, हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना काही तासांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे कोणते आक्रमक पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अश्यातच, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे ठाकरे गटाला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे.
दरम्यान, देशपांडे यांच्या हल्ल्याबद्दल बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की… “मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यावर झाला हल्ला हा निश्चितपणे निंदनीय आहे… पण या निमित्ताने पुन्हा एकदा कायदा संस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, काल अकोल्यामध्ये शिंदे गटाच्या संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांचे दिवसाढवळ्या झालेली मारामारी आणि
त्यात गंभीर जखमी झालेले जिल्हाप्रमुख हे सगळे ज्या पद्धतीने घडत आहे, यावरून एकूण गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस कमकुवत ठरत आहेत का? असेच म्हणावे लागेल.’ असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या आहेत. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
हाताला फ्रॅक्चर, डिस्चार्जनंतर संदीप देशपांडे म्हणतात…
दरम्यान, रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले, “आम्ही कुणाला घाबरत नाही… आणि घाबरणार देखील नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे..’ असं संदीप देशपांडे म्हणाले.