नवी दिल्ली: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे तो मुंबईत वर्ग करावा, अशी मागणी करणारा अर्ज अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे, पण बिहार सरकारने आज त्या मागणीला विरोध केला असून तिची मागणी अमान्य करावी, असा युक्तिवाद कोर्टात केला आहे.
तिची ही याचिका अनावश्यक व गैरलागू आहे असे बिहार सरकारने म्हटले आहे. बिहार सरकारने एका प्रतिज्ञापत्राद्वारे आपली ही भूमिका कोर्टापुढे सादर केली आहे. गुन्हा ज्या ठिकाणी घडला आहे त्याच न्याय क्षेत्रात याविषयीच्या तक्रारी दाखल झाल्या पहिजेत, ही संकल्पना या प्रकरणात राबवता येणार नाही, असेही बिहार सरकारच्या वकिलांनी कोर्टात नमूद केले आहे.
रियाच्या अर्जावरून सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकार बरोबरच महाराष्ट्र सरकार आणि रिहाच्या वडिलांनाही याप्रकरणी त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार बिहार सरकारने आपली ही भूमिका मांडली आहे.