मुंबई : सर्वोच्च न्यायालयानेच सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. यानंतर पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं. यात त्यांनी “सत्यमेव जयते” इतकंच म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी केली यापूर्वी केली होती.
मात्र, यावरुन तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना फटकारलं होतं. आता पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.