मुंबई – नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते ‘अजित पवार’ यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक व्यक्तव्य केलं होत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरु आहेत. यावेळी अजित पवार यांनी “छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते.’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. मात्र, त्यांच्या या व्यक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आता अजित पवारांच्या भगिनी आणि खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांची पाठराखण केल्याच पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविरोधात सत्तेतील लोक रस्त्यावर उतरले आहेत. जेव्हा त्यांच्या विचारांचे लोक बोलतात तेव्हा पाठराखण करण्याचे पाप भाजप करते, स्वतःच अपयश झाकण्यासाठी ते अजित पवार यांच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
त्यापुढे म्हणल्या, “आपल्याला हे विसरुन चालणार नाही की आपण सर्व लोकप्रतिनिधी आहोत. बेरोजगारी आणि महागाईसारखे गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. माझी भाजपाला विनम्रपणे विनंती राहिल. तुम्ही संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आंदोलन केले. तो तुमचा अधिकार आहे. पण सत्तेत असताना रस्त्यावर उतरणे, हे मी पहिल्यांदाच पाहिलं”. असं देखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.