मुंबई: श्रीरामपूर मध्ये पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की आत्तापर्यंत मी साहेबांचा एवढा राग कधीच पहिला नव्हता. त्यानी जर एकदा सांगितले मला या प्रश्नच उत्तर द्यायचे नाही तरीही चार पाच वेळा तोच प्रश्न विचारल्याने साहेब संतापले होते.
त्या म्हणाल्या कि जर त्यांनी सांगिले आहे कि मला या प्रश्नावर नाही उत्तर द्यायचं तर तोच तोच प्रश्न का विचारावा. आणि उत्तर द्यायचे की नाही तेवढे अधिकार आहेत प्रत्येकाला. दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेतर राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करत आहेत, तर आता नातेवाईकही पक्ष सोडून जाणार असल्याच्या तयारीत आहेत? या प्रश्नावर शरद पवार भडकले होते. त्यांचे हे रौद्र रूप पाहून सर्वच अवक झाले होते.