मुंबई : शिवसेना नेते व परिवनहमंत्री अनिल परब यांना ईडी कडून नोटीस बजावण्यात आली असून, त्यांना ३१ ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बातमीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. यावर आता राज्यातील नेते मंडळींकडून विविध संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असे मी कधीच पाहिले नाही . कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल्या जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपली केंद्र सरकारवर टीका केली आहे.
तर, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी यावर उत्तर देताना, एखाद्या विरोधी पक्षनेत्यांची किती कामं मुख्यमंत्रीकडे असतात.
आम्ही दोन्हीकडे राहिलो आहेत. त्यामुळं आम्हाला चांगलं माहीत आहे. एखाद्या विरोधी पक्षनेत्याने मुख्यमंत्री यांची भेट घेतली तर गैर काय?” असे म्हणत पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला.