मुंबई – मुंबईमधील चेंबूरपरिसरातील सामूहिक बलात्काराचा तपास एसआयटीमार्फत व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ‘सुप्रिया सुळे’ यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यादरम्यान सामूहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध करत सुप्रिया सुळे यांनी पोलीस, गृहखाते आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.
जालना जिल्ह्यातील मुलीवर मुंबईत विषारी ड्रग्ज पाजून सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा यामध्ये मृत्यु झाला.ही घटना गंभीर आहे.पुण्यातही एका चिमुरडीची हत्या करण्यात आली. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.(१/३) pic.twitter.com/vIitYC1ooq
— Supriya Sule (@supriya_sule) August 30, 2019
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी असून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. या घटनेला आज एक महिना उलटून गेल्यानंतरही आरोपींना अटक झालेली नाही. हे सरकार असंवेदनशील आहे. पीडितांना न्याय देणे जमत नसेल तर गृहमंत्रालयाने याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी सुळे यांनी केली. या पुढे राज्यात मुलींवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही’.
या मोर्चामध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष @nawabmalikncp यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.(३/३) pic.twitter.com/YlZxavqFsu
— Supriya Sule (@supriya_sule) August 30, 2019