बारामती (जळोची) – विकास कामासाठी राजकीय स्तरावर एकत्र काम करायचे असेल तर समविचारी पक्ष एकत्र येणार असतील तर आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली बाब आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत व्यक्त केले.
नुकतेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला रोखण्यासाठी आम्ही कोणासोबतही आघाडी करायला तयार असून, महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिल्याची आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले. त्यात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीसोबत एमआयएम येणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
सध्या राज्यात तीन पक्ष्यांचे सरकार आहे. त्यापैकी शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कार करणार पक्ष मानला जातो. एमआयएम जर महाविकास आघाडीत सामील होणार असेल तर शिवसेनेची काय भूमिका असेल, याबाबत बोलताना खासदार सुळे सावध भूमिका घेत म्हणाल्या की, एमआयएमचे नेते नेमके काय म्हणाले, मला माहित नाही. याबाबत सदर विषय समजून घेतल्यानंतर बोलता येईल.
मी वास्तवतेकडे बघते…..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. त्याबाबत मी काल्पनिक चित्राकडं पाहत नाही, वास्तवतेकडं बघते, असं खोचक उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
देशाच्या ऐक्य अन् सुरक्षेबाबत चिंतेचा विषय…
आपल्या देशात एखादा पेपर फुटला तरी त्याची चौकशी होते. ईडी, सीबीआय या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यांची गोपनीय माहिती अशी बाहेर येत असेल तर ही बाब देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेची आहे. याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार आहे. असे सुळे यांनी सांगितले.