निर्भयाच्या वडिलांची अपेक्षा, दोषी वेळकाढूपणा करत असल्याचा आक्षेप
नवी दिल्ली : महिलांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी दोषींकडून दाखल करण्यात येणाऱ्या याचिकांबाबत मार्गदर्शक धोरण आखावे, अशी विनंती निर्भयाच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
देशभर खळबळ माजवलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या पवन गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. त्याची याचिका फेटाळली हे दिलासादायक आहे. निकाल ऐकण्याआधी आमचं हृदय धडधडत होतं आणि अखेरीस सकारात्मक बातमी आली, असे ते म्हणाले.
या चारही नराधमांपकडून वेळकाढूपणा करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. पिडीतेला वेळेत न्याय मिळण्यासाठी काही मार्गदर्शक धोरणे आखण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
ही याचिका सत्र न्यायलाय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली. अशा याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाने कालबध्द मुदत आखून द्यायला हवी. त्यामुळे निर्भया आणि अन्य मुलींना कालबध्द न्याय मिळू शकेल.
या याचिकेत त्याने दिल्ली उच्च न्यायलयाने 19 डिसेंबरला न्यायलयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली. वकिलांनी न्यायलयात खोटी कागदपत्रे सादर केली आणि न्यायालयाच्या सुनावणी वेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल या याचिकेत नापसंती व्यक्त केली आहे. विनय शर्मा (26), मुकेश कुमार (32), अक्षय कुमार सिंग (31) आणि पवन यांना 1 फेब्रुवारीला फाशी ठोठवावी, असे नवे डेथ वॉरंट शुक्रवारी जारी केले आहे.
त्यापुर्वी शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेश याच्या दयेचा अर्ज फेटाळला. अन्य तीन आरोपींनी फाशीपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे अद्याप दयेचा अर्ज केला नाही. तसेच अक्षय आणि पवन यांनी अद्याप सर्वोच्च न्यायलयात दुरूस्ती याचिका दाखल केली नाही.
ए. पी सिंग या वकीलांपार्फत दाखल केलेल्या याचिकेत हा गुन्हा घडला त्यावेळी म्हणजे 16 डिसेंबर 2012ला पवन गुप्ता हा अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. मात्र हा त्याचा दावा त्याने त्याला ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायलयात गेल्यावर्षी नऊ जुलैला केला होता. तो सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला होता.