नवी दिल्ली – राफेल कराराप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत आले आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना नोटीस बजावली असून २२ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारावर पुनर्विचार याचिका स्वीकार केले आहे. यानंतर राफेल करारामध्ये ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध लावला असे न्यायालयाने म्हटले असून त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे.