नवी दिल्ली – करोनाच्या काळात समुह संसर्गाचा धोका कायम असल्याने सणासाठी सरकारकडून नियमावली ठरवली जात आहे. अशातच जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वालाही सुरूवात झाली असून मंदिरे उघडण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. यावर आज न्यायालयाने सुनावणी केली.
Supreme Court allows Jain temples at Dadar, Byculla and Chembur in Mumbai to open for worshippers for last two days of Paryushan on August 22 and 23, while observing Centre’s SOP on opening of religious places. pic.twitter.com/qjgfdfmzpH
— ANI (@ANI) August 21, 2020
पर्युषण काळात मुंबईतील तीन ठिकाणी मंदिर खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूर येथील जैन मंदिरे प्रार्थनेसाठी खुली करण्यास परवानगी दिली आहे. ही मंदिरे पर्युषण पर्वाच्या अखेरचे दोन दिवस म्हणजेच २२ व २३ ऑगस्टला खुली राहणार आहेत. तसेच यावेळी केंद्र सरकारच्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
तसेच, ही सवलत इतर मंदिरे खुली करण्यासाठी वा मोठी गर्दी होणाऱ्या गणेश चतुर्थी उत्सवासाठी (गणेशोत्सवासाठी) देता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे.