भुवनेश्वर – ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथ यात्रेस सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं जगन्नाथ रथ यात्रा रद्द केल्याचा निर्णय अखेर सोमवारी बदलला आहे. कोर्टाने यात्रेला सशर्त परवानगी दिली आहे.
देशभरात परसत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याआधी सुप्रीम कोर्टाने रथयात्रेवर स्थगिती आणली होती. मात्र, कोर्टाच्या यानिर्णयाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानं पुर्नविचार करावा, असं याचिकेत म्हटलं होतं.या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ही सुनावणी केली.
या सुनावणी दरम्यान कोर्टाने निर्देश देताना म्हटले आहे की, मंदिर समिती राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत समन्वय करुन आरोग्याशी कोणताही तडजोड न करता आणि योग्य ती खबरदारी घेऊन यात्रेचं आयोजन करेल.
कोर्टाने म्हटले की, फक्त पुरीमध्ये यात्रा निघेल, ओडिशात इतरत्र कुठेही यात्रा काढण्यास परवानगी नसेल.
Supreme Court says, Puri rath yatra will be held with coordination of Temple committee, State and central Govt without compromising with health issue. pic.twitter.com/EECA3dR3fT
— ANI (@ANI) June 22, 2020
दरम्यान, याआधी कोलरा आणि प्लेगच्या साथीत देखील अशाच पद्धतीने नियम आणि अटींसह मर्यादित लोकांच्या उपस्थितीत रथयात्रा आयोजित करण्यात आली होती.