नवी दिल्ली – वादग्रस्त ट्विटच्या संदर्भाने भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांच्याविरोधात काही राज्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारी आणि “एफआयआर’च्या अनुषंगाने कोणतीही कारवाई बळाने करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
नुपूर शर्मा यांनी जीवे मारण्याच्या धमक्यांची दखल घेत न्यायालयाने नुपूर शर्मा यांना ट्विटसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या अनुषंगाने कोणत्याही कारवाईपासून संरक्षण देण्याचे निर्देश दिले.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कॉंग्रेस काढणार पदयात्रा,जनतेपर्यंत पोहचून देणार ‘हा’ संदेश
नुपूर शर्मा यांना प्रत्येक ठिकाणच्या न्यायालयात जायला लागू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह दिल्ली, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह काही राज्यांनाही नोटीसा बजावल्या आणि यासंदर्भातील प्रत्युत्तर 10 ऑगस्टपर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले. या संदर्भातील पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.