शिवसेनेचे उपनेते आढळराव पाटील यांचे नागरिकांना आवाहन
मंचर – करोना हा भयंकर रोग असून बेशिस्तीचे वर्तन कुणीही करू नये. घरात राहा, गर्दी टाळा आणि स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, तसेच देशासाठी सरकारला साथ द्या, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य प्रशासन, डॉक्टर्स, पोलीस प्रशासनातील सर्वजण करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेसारखे बलाढ्य आणि प्रगत देशही या रोगापुढे हतबल झाले आहेत.
27 जानेवारीला भारत व इटली या दोन्ही देशांत सारखेच म्हणजे प्रत्येकी 3 रुग्ण आढळले होते. सध्या इटलीमध्ये सुमारे 6 हजार नागरिक मृत्युमुखी पडले असून, दररोज सुमारे 500 नागरिकांचा मृत्यू होत आहे. आपण वेळीच शिस्त पाळली नाही, तर कल्पनाही करता येणार नाही अशा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.