आळंदी- सध्या देशात करोना महामारी रोगाचा फैलव होत असल्याने सर्वत्र जमावबंदी व संचारबंदी लागू आहे. बंदी कालावधीत दररोज रस्त्याच्या कडेला बसून गटई काम करून पोट भरणाऱ्यांचे हातावर पोट आहे. या कामगाराचे जीवन सध्या कठीण झाले आहे, त्यामुळे राज्यातील अशा सर्व गटई कामगारांना राज्य सरकारने 15 हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करावी, असे अवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ गटई कामगार सेल यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदद्वारे करण्यात आली आहे.