रायगड – पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि समाज सेविका शांती देवी यांचे रविवारी रात्री रायगड जिल्ह्यातील गुणूपूर येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.
पंतप्रधान म्हणाले, गोरगरीब आणि दारीद्य्र रेषेखालील नागरिकांच्या शांती देवीजी या आवाज बनल्या होत्या. लोकांचे दैन्य घालवून आरोग्यदायी जीवन देण्यासाठी त्या आयुष्यभर कार्यरत होत्या. त्यांच्या निधनाने मला वेदना झाल्या. त्यांचे चाहते आणि कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.
माओवादीग्रस्त रायगड जिल्ह्यातील त्यांच्या समाजकार्यासाठी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गेल्या वर्षी 25 जानेवारीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेली सहा दशके त्यांनी आदिवासी मुलींच्या उध्दारासाठी आपले आयुष्य पणाला लावले होते. जटा निर्मुलनाच्या कार्यक्रमाच्या प्रणेत्या अशीही त्यांची ओळख होती.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ही शांती देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिक्षणातून आदीवासी मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या अथक प्रयत्नाबद्दल त्या लक्षात सदैव स्मृतीत राहतील, असे त्यांनी म्हटले आहे.