मुंबई – महानायक अमिताभ बच्चन ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लाॅगर याद्वारे विविध कविता, संदेशाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत संवाद साधत असतात. मात्र नुकतीच त्यांनी एक कविता पोस्ट केलीय. त्यामुळे त्यांच्यावर एका महिलेने चोरीचा आरोप केला आहे.
“थोडा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध खुशियों का
थोडी पत्तियां ख्यालों की..
थोडे गम को कूटकर बारीक,
हंसी की चीनी मिला दीजिये..
उबलने दीजिये खाबों को
कुछ देर तक…!
यह जिंदगी की चाय है जनाब..
इसे तसल्ली के कप में छानकर
घूंट घूंट कर मजा लीजिये..!!”
अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या या कवितेवरून महिलेने त्यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. टीशा अग्रवाल या महिलेने चोरीचा आरोप केला असून त्यांनी दावा केला आहे की, ही कविता त्यांची असून त्यांना याचे श्रेय मिळायला हवे. टीशा यांनी आपल्या फेसबुकवर देखील याबाबत लिहिले आहे. त्यांनी म्हटलेय की, जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट काॅपी करतात आणि त्याचे क्रेडिटही देत नाही.. अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख…
टीशा या कवयित्री आहेत. त्या सतत फेसबुकवर विविध कविता शेअर करत असतात. चहा या विषयाला धरून त्यांनी ही कविता 24 एप्रिल 2020 रोजी लिहिली होती. त्याचवेळी ती फेसबुकवर देखील अपलोड केली होती. अद्याप याबाबत महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.