कॉंग्रेसकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप
चंदीगड – पंजाबात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत कॉंग्रेसकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची तक्रार भाजपचे गुरूदासपुर लोकसभा मतदार संघातील उमेदवार सनी देओल यांनी केली असून त्यांनी या प्रकरणात पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उद्याच्या मतदान प्रकियेसाठी जादा निमलष्करी दले तैनात करावीत आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर होणार नाहीं यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केलेल्या अर्जात केली आहे. गुरूदासपुर मतदार संघ अतिसंवेदनशीलम्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हा मतदार संघ सीमावर्ती भागात आहे आणि गेल्या पंचायत निवडणूकांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला होता या आधारावर हा मतदारसंघ अति संवेदनशील म्हणून घोषित होण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.