राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांची खरपूस टीका
तळेगाव – मावळ तालुक्यातील बहुतांश गावात विकासकामांची गरज आहे. चिंचोलीतील रस्ते तरी विद्यमान आमदारांनी पाहिलेत का? देहूरोड उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे दररोज तिथे वाहतुकीचा खोळंबा होतो. नागरिकांच्या त्रासात रोज वेगवेगळी भरच पडत आहे. तालुक्याचा विकास राहिला बाजूला. आणि यांना मंत्रिपद हवे, कॅबिनेट मंत्री व्हायचेय. याआधी तालुक्यातील प्रलंबित कामे तरी करा, अशी खरपूस टीका विरोधकांचे नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी चिंचोली गावात केली.
शेळके यांचा गुरुवारी देहूगाव आणि परिसरातील इतर गावांमध्ये प्रचार दौरा आयोजित केला होता. चिंचोली गावापासून सकाळी हा दौरा सुरु झाला. भैरवनाथाचे दर्शन घेऊन सुनील अण्णांनी मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांनी अण्णांचे वाजत-गाजत स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. त्यांच्यासमवेत देहूरोड कॅंन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ पानसरे, नंदू अप्पा जाधव, गोविंदराव जाधव, प्रवीण झेंडे, देहूरोड जकात नाक्याचे रामभाऊ सावंत, धीरज सावंत, पंडित जाधव, दिलीप पानसरे, धनराज शिंदे, बाळू जाधव, पुष्पक जाधव, प्रसाद सावंत, संदीप जाधव, विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भैरवनाथ तरुण मंडळ, हनुमान मंडळाचे पदाधिकारी, कार्यकत, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते पुष्पक जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील अण्णांनी केक कापून शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णांबरोबर ग्रामस्थांनीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. विद्यमान आमदार इथे कधी फिरकले नाहीत. अण्णा, तुम्ही मात्र आलात, आमच्या समस्या जाणून घेतल्या. आम्ही निवडून आणणार, अशा भावना चिंचोली ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
देहूगाव परिसरातील विविध गावांमधून गुरुवारी त्यांचा प्रचार दौरा आयोजित केला होता. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, काळोखेमळा, आदी भागातून सकाळ आणि दुपारच्या सत्रात शेळके यांनी पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. किन्हई गावात आल्यावर त्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी त्यांना महिलांनी औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनीही सुनील अण्णांची भेट घेऊन आपुलकीने चौकशी केली आणि त्यांना निवडणुकीतील विजयासाठी तोंडभरून आशीर्वाद दिला. “सुनील अण्णा होणार आमदार, तेव्हाच किन्हईचा विकास होणार’ अशा उत्स्फूर्त घोषणाही नागरिकांनी यावेळी दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव पिंजण, कॉंग्रेस सेवादल देहूरोडचे अध्यक्ष पिंजण, उपाध्यक्ष बाळू पिंजण, किन्हई गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पिंजण, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पिंजण, सामाजिक कार्यकर्ते अमित पिंजण, अमोल पवार, विशाल मुंडे आदी उपस्थित होते.
भाषण करता-करताच वीज गेली !
सुनील शेळके यांनी देहूरोड भागातील चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, काळोखेमळा, लक्ष्मीनगर, माळवाडी, बोडकेवाडी, विठठ्लवाडी येथील मतदारांच्या गाठीभेठी घेतल्या. झेंडेवाडी येथे मतदारांशी संवाद साधत असतानाच अचानक वीज गेली. तेव्हा सुनील अण्णांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द निघाले, “अनियमित वीजपुरवठ्याचा घ्या हा पुरावा! बघा, भाषण करता करताच वीज गेली!’ आणि उपस्थितांमध्ये खसखस पिकली. याप्रसंगी राष्ट्रीय कबड्डीपंच वसंत झेंडे तसेच कैलास झेंडे, प्रदीप झेंडे, प्रवीण झेंडे, चेतन झेंडे, पंकज झेंडे, विशाल झेंडे, किसनराव झेंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवजीवन मित्र मंडळ आणि नवमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
किन्हईचा विकास कधी होणार ?
देहूगाव परिसरातील गावांमधून सुनील शेळके यांनी प्रचार दौरा आयोजित केला होता. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, काळोखेमळा, आदी भागातून सकाळ आणि दुपारच्या सत्रात शेळके यांनी पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. किन्हई गावात आल्यावर त्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी त्यांना महिलांनी औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनीही सुनील अण्णांची भेट घेऊन आपुलकीने चौकशी केली आणि त्यांना निवडणुकीतील विजयासाठी तोंडभरून आशीर्वाद दिला.
“सुनील अण्णा होणार आमदार, तेव्हाच किन्हईचा विकास होणार’ अशा उत्स्फूर्त घोषणाही नागरिकांनी यावेळी दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष वैभव पिंजण, कॉंग्रेस सेवादल देहूरोडचे अध्यक्ष पिंजण, उपाध्यक्ष बाळू पिंजण, किन्हई गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पिंजण, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत पिंजण, सामाजिक कार्यकर्ते अमित पिंजण, अमोल पवार, विशाल मुंडे आदी उपस्थित होते.