पुढील वर्षी भारतात क्रिकेटची सर्वात मोठी आयसीसी स्पर्धा म्हणजे एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे सर्वच देशांचे संघ या विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेऊन तयारीला लागले आहेत. मात्र दुसरीकडे भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंनी घेतलेल्या विश्रांतीवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मागील दोन टी-२० विश्वचषकांमध्ये भारतीय संघात वेगवेगळे बदल करूनही कोणतेही यश हाती आले नाही. त्यामुळे आता एकदिवसीय विश्वचषकसाठी संघाने आतापासूनच प्रमुख खेळाडूंसोबतच सर्व सामने खेळावेत. वरिष्ठ खेळाडूंनी वर्कलोडच्या नावाखाली घेतलेल्या विश्रांतीवर सुनील गावस्कर यांनी टीका केली आहे.
“संजू सॅमसनला तिसऱ्या सामन्यात खेळवले नाही तर आता लोकं…”,माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
भारताने आत्तापासूनच एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या १५ खेळाडूंनी निवडण्याची तयारी सुरु करायला हवी. कारण मागील दोन विश्वचषकात भारतीय संघ व्यवस्थापनाने केलेल्या मोठ्या चुका उघड झाल्या आहेत. संघ निवड करताना व्यवस्थापनाचा गोंधळ उडाल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर मागील काही स्पर्धांमध्ये भारतीय संघाची गोलंदाजी अत्यंत कमकुवत जाणवली आहे. त्यामुळे आता सुनील गावस्कर यांनी एक मैलाचा सल्ला दिला आहे.
“संजू सॅमसनला तिसऱ्या सामन्यात खेळवले नाही तर आता लोकं…”,माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
गावस्कर यांनी म्हटले आहे की, “फलंदाजी विभागाची काळजी घ्यायला हवी. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला वर्षाहून अधिक कालावधी राहिला आहे. त्यामुळे या कालावधीत फलंदाजांना विश्रांती द्यायला नको. मर्यादित षटकांच्या सामन्यात फलंदाजांमधील एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा आहे. त्यासाठी एकमेकांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे आणि हे सर्व केव्हा होईल, जेव्हा ते सातत्याने सोबत खेळतील.” त्याचबरोबर त्यांनी संघ व्यवस्थापणाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या बदलांवरही नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली. केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे . त्याच्याजागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र ऐन आयसीसी स्पर्धेच्या तोंडावरच असे बदल योग्य वाटत नाहीत. वरिष्ठ खेळाडूंमध्ये फक्त शिखर धवनने ३० पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत सर्वच वरिष्ठ खेळाडूंचे पुरागमन होणार आहे.