पवनानगर – पवनमावळ मधील प्रभाचिवडी येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात सूर्यफूल हे पीक घेतले आहे. हे पीक चांगले जोमात आले असून, सूर्यफुलांच्या बियांना मोठी मागणी असून, त्यापासून मधून चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देऊन अन्य पिकांकडे वळत आहेत.
एकीकडे वातरणातील सततच्या बदलामुळे व उन्हाच्या वाढलेल्या तडाख्यामुळे बागायती शेती व इतर पिकांवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. सततच्या वातावरणीतल बदलामुळे उत्पादन ही घट पहायला मिळत आहे.त्यामुळे अनेक शेतकरी आता शेतीमध्ये विविध पिकांचे प्रयोग करताना दिसत आहेत.
बदलत्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन मावळातील शेतकऱ्यांनी शेतात पिके घेण्यास सुरुवात केली व कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. शेतकरी शेतीकडे उपजिविकेचे साधन म्हणून पाहत होता. आता त्याचा शेतीच्या बाबतीतील दृष्टीकोन बदलून व्यवसायिक झाला आहे. शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वाढला आहे.
ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले सूर्यफूल त्या दिशेने वळते.
सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल हे गोड्या तेलाप्रमाणे अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते. तर 70 ते 80 दिवसांत हाती येणाऱ्या पीकामुळे शेतकरी त्याकडे वळत आहेत.