मुंबई- सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं महत्वाचं असते, यावर अनेकांचं दुमत नाही. मात्र सुंदर नसणं किंवा लठ्ठ असण्याने कुटुंबीयांना किंवा स्वत:ला सदैव अपमान सहन कारावा लागतो. या विषयावर आधारीत कलर्स मराठीवर सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या चांगलीच गाजते आहे.
काही काळातच मालिकेतील प्रत्येक पात्र महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये जाऊन पोहचले आहे. लतिका, अभिमन्यू, सज्जन, बापू यांच्या पात्रांवर विशेष प्रेम व्यक्त केलं जात आहे. मात्र आता ही मालिका एका महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. लतिकाचं लग्न मोडतं. पैसे नसल्याने वऱ्हाडी मंडपातून निघून जातात. लग्न विशेष हा भाग गेले तीन दिवस चांगलाच गाजतो आहे.
दरम्यान, आता शत्रू असलेल्या अभिमन्यूला बोहल्यावर चढवण्याशी शक्यता दिसते आहे. तशी अट त्याच्या वडिलांनी त्याला घातली आहे. त्याचबरोबर लतिका सुद्धा म्हणताना दिसते की लग्न झालं नाही तर लतिकाचे वडिल बापूंचा जीव वाचणार नाही.
या वळणावर आलेल्या या मालिकेला सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली आहे. आता अभिमन्यू बोहल्यावर चढणार का?v, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.