बांदा- उत्तरप्रदेशातील आपल्या मूळ गावी दाखल झालेल्या स्थलांतरित मजुरांमध्ये आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या होण्याचे प्रकार सातत्याने घडत असून कालही त्या राज्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मजुरांनी आत्महत्या केल्या. ब्रिज राघव यादव वय 36 आणि राजू वय 21 अशी आत्महत्या करणाऱ्या दोन मजुरांची नावे आहेत.
ब्रिज राघव हे दोन महिने बेकार होता. त्याला कुठेच काम धंदा न मिळाल्याने त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. दुसऱ्या प्रकारात राजू नावच्या मजुरानेही याच कारणामुळे आत्महत्या केली. तो गुजरामधील वापी जिल्ह्यातून आपल्या गावी परतला होता. उत्तरप्रदेशात आर्थिक चणचणीमुळे आणि रोजगारा अभावी गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी आत्महत्यांचे प्रकार घडले आहेत.