लाखनगाव-भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे. परंतु कोरोनाव्हायरसच्या भितीमुळे काही कामगारांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर येऊन आम्हाला गावी जायचे आहे. असे म्हणत कारखाना प्रशासनाने आमची सोय करावी अशी मागणी केली.
यावेळी देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील ऊस तोडणी मजूरांनी प्रशासनाला सहकार्य करावे.ऊस तोडणी मजुरांनी घरी जाण्याचा आग्रह धरू नये.जिल्हा बंदी असल्यामुळे जागोजागी पोलीस प्रशासनाचे चेक पोस्ट आहेत. तेथे घरी जाण्यासाठी निघालेल्या ऊस तोडणी मजुरांची गाडी अडवली तर तेथील पोलीस प्रशासन कायदेशीर मार्गाचा अवलंब करेल. त्यासाठी उसतोडणी मजुरांनी कारखाना स्थळावर आणि कारखाना कार्यक्षेत्रात रहावे असे आवाहन आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
यावेळी उपस्थित ऊस तोडणी मजुरांच्या मागण्या समजाऊन घेत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी कारखाना स्थळावरील तीन हजार ऊसतोडणी कामगार आणि कार्यक्षेत्रातील साडेतीन हजार कामगारांना कारखान्याच्या वतीने शासन आदेशानुसार लॉकडाऊन असेपर्यंत किराणा भुसार, जनावरांना चारा , पाणी ,वैद्यकीय सुविधा देण्याचे आश्वासन दिले.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे ,कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि संचालक देवदत्त निकम,याडवोकेट प्रदिप वळसे पाटील,तहसीलदार रमा जोशी,गटविकास अधिकारी जालिंदर पठारे ,पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे ,कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, उपस्थित होते .
ऊस तोडणी कामगारांचे मुकादम, कारखाना प्रशासन आणी शासकीय अधिकारी यांची यावेळी संयुक्त बैठक झाली .या बैठकीत प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले . यावेळी काही ऊस तोडणी मजुरांनी आपली मजुरी मुकादमाकडे न देता थेट आमच्या हातात द्यावी अशी मागणी केली. त्यालाही कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी मान्यता दिली .तसेच ऊस तोडणी मजुरांना योग्य ते मानधन देण्याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल असे बेंडे यांनी सांगितले.