रवींद्र कदम ट्रॉलींना रिफ्लेक्टर नसल्याने दररोज होताहेत अपघात
ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक वाहन चालकाच्या जीवावर
नगर – प्रमाणापेक्षा जास्त ऊस, विना पासिंग डबल ट्रॉलीचा वापर, वाहतूक नियांचे उंल्लघन, पुरेशा खबरदारीचा अभाव, ट्रॉलीला रिफ्लेटर नाही, अशा पद्धतीने सुरू असलेली उसाची वाहतूक ही रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेयटीव टेप्स बसवण्याच्या सूचना वारंवार संबंधित विभागाकडून दिल्या जात असून ही कारखाने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांकडून ऊसवाहतूक केली जात आहे. ही ऊस वाहतूक ट्रॅक्टर, बैलगाडीद्वारे, तसेच ट्रकने केली जाते. या वाहनंमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रिफ्लेयटीव टेप्स लावण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने ग्राहक संरक्षण सतिमीला दिल्या होत्या.
रिफ्लेयटीव टेप्स न बसवणाऱ्या साखर कारखान्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गेल्यावर्षी दिल्या होत्या. परंतु अनेक कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रोलिला तसेच ट्रकला रिफ्लेटर न बसवल्यमुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असून, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखवली आहे.
सध्या जिल्ह्यात ऊस वाहतूक साखर कारखान्यांकडून सुरु झाले आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघातांना सामोरे जावे लागत असून अनेकांना अपंगत्व आले आहे. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ऊस गाळप हंगा सुरु होण्यापूर्वीच साखर कारखान्यांना सुचना दिल्या होत्या. याची अंलबजावणीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु या विभागाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
अशी घ्या काळजी : पाटील
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाहन चालविताना वाहनचालकाने शिस्त व संयम राखून वाहन चालविल्यास रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला निश्चितच आळा बसेल, त्याचबरोबर वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, कारण मागून येणारे वाहन पाहता एका बाजूला थांबून मगच मोबाईलवर बोलावे. त्याचबरोबर चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालविणारा व शेजारी बसलेल्या इसमाने सीटबेल्ट लावणे फायदेशीर आहे.
अशा छोट्या-छोट्या गोष्टींचे पालन केल्यास रस्ता अपघाताला आळा बसून जीवित व वित्तहानी टळू शकेल. तसेच पूर्वी वाहनांना रिफ्लेक्टर नव्हते. त्यामुळे मोठ्या वाहनांच्या मागे हॉर्न प्लीज, ओके’ असे लिहिलेले असायचे. आता वाहनांना रिफ्लेक्टर आल्याने या वाहनांवर नो हॉर्न प्लीज’ असे लिहिलेले आढळून येते. शासनाने आपल्याला वाहन परवाना हा सुरक्षित वाहन चालविण्यासाठी दिलेला असतो.
पण काहीजण नशेच्या आहारी जाऊन किंवा रात्री उशीराचा प्रवास करणे, वाहनांना मागे दिवे नसणे, घाटरस्ता किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे अशा छोट्या-छोट्या चुकांमुळे मोठे अपघात होतात. त्यासाठी वाहन चालविताना आपल्याबरोबर दुसऱ्याचेही नुकसान होणार नाही, याची प्रत्येकानेच काळजी घेतल्यास निश्चितच अपघाताचे प्रमाण कमी होईल असे सांगितले.