पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्याला बसलेल्या पुराच्या फटक्यामुळे उसाचे पीक पाण्यात दहा ते पंधरा दिवस बुडाले आहे. या पिकाच्या संवर्धनासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता कृषी शास्त्रज्ञांसह संस्थेचे पदाधिकारी प्रत्यक्ष शेतीला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ऊसशेतीच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
पुरामुळे या जिल्ह्यांतील हजारो एकरांवरील उस पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकाच्या संवर्धनासाठी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे कृषी शास्त्रज्ञ व वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांनी मोहीम हाती घेतली आहे. संस्थेतील कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करून या चारही जिल्ह्यांकरिता एक गट स्थापन करण्यात येणार आहे. गावोगावी व शेतीला प्रत्यक्ष भेट देऊनही मार्गदर्शन केले जाणार आहे.