निमसाखर-येथे नीरा डाव्या व उजव्या कालव्यातील पाण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन साखर वाटप करुन आनंद साजरा करण्यात आला.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्याने शिल्लक राहणारे पाणी बारामती, इंदापूरसह अन्य तालुक्यांना याचा फायदा मिळत होता. मात्र भाजप सरकारच्या काळामध्ये हे पाणी नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्याला मिळत होते. ते त्तकालीन सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हे पाणी उजव्या कालव्याला म्हणजे फलटण, माळशिरस, संगोला यांसह अन्य तालुक्यांना मिळणार होते. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील त्या लाभ क्षेत्रातील पाणी कमी झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा निर्णयामध्ये बदल करत जैसे थे निर्णय घेतल्याने निमसाखर परिसरात आनंद व्यक्त करत साखर वाटप करण्यात आली.
यावेळी निमसाखर सोसायटीचे सदस्य सुरेश लवटे व अन्य ग्रामस्थांनी साखर वाटप केली. यावेळी यशवंत सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार रणवरे, माजी पंचायत समितीचे उपसभापती जयकुमार कारंडे, विनोद रणसिंग, विरसिंह रणसिंग, श्रीकृष्ण सोसायटीचे अध्यक्ष विकास रणसिंग, सदाशिव आडसुळ, सुनील मोरे, महादेव रणवरे यांसह नागरीक उपस्थित होते.