जयपूर – होय, माझा जावई युरोपातील एका देशाचा, इंग्लंडचा पंतप्रधान झाला आहे. जावई इतक्या मोठ्या पदावर असल्याचा कोणाला आनंद होणार नाही. मात्र, ऋषी पंतप्रधान असला, तरी आमच्या आयुष्यावर त्याचा कसलाही परिणाम झालेला नाही. आम्ही आमचे आयुष्य आमच्या पूर्वीच्याच पद्धतीने जगत आहोत. तो पंतप्रधान झाल्याचे कसलेही दडपणही आमच्यावर नाही, असे प्रतिपादन लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांनी केले आहे.
Karnataka : विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भाजपला लव्ह जिहाद महत्वाचा – सिद्धरामय्या
16व्या जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये “माझी पुस्तके आणि माझ्या श्रद्धा’ या सत्रात सुधा मूर्ती यांची प्रकट मुलाखत मंदिरा नायर यांनी घेतली. सुधा मूर्ती म्हणाल्या, ऋषी पंतप्रधान झाल्यानंतर अनेकांनी फोन करुन आमच्या भाग्याबद्दल अभिनंदन केले. मात्र, तो इंग्लंडमध्ये त्याच्या देशातील नागरिकांची निरलसपणे सेवा करतो आहे आणि आम्ही आमचे आयुष्य आमच्या रितीने जगतो आहोत. हेच महत्त्वाचे आहे, असेही मूर्ती म्हणाल्या.
विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन; मृत्यूपूर्वी व्यक्त केली ‘ही’ इच्छा
माझ्या मुलीने सांगितले की जर तुम्हाला समाजसेवा करायची नसेल, तर ती कोणाकडूनही करण्याची अपेक्षा करू नका. माझ्या मुलीने मला विचारले होते की, आयुष्यातील तुझे ध्येय काय आहे? पहिली 25 वर्षे मी प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी स्वतःसाठी काम केले होते. कारण मला अभियांत्रिकी महाविद्यालयात हे दाखवायचे होते की मुलीही मुलांइतक्याच हुशार. मी 55 वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथे एकही महिला नव्हती.
विशेष म्हणजे, मूर्तींचे अभियांत्रिकी शाखेत शिकणे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जाण्यातून आले आहे. त्यांचे कुटुंबिय अभियांत्रिकी शिक्षणाच्या विरुद्ध होते. मूर्ती यांनी त्यांचे प्री-युनिव्हर्सिटी शिक्षण 1967 मध्ये पूर्ण केले आणि त्यांना खूप चांगले गुण मिळवले होते. मग त्यांनी टाटा मोटर्समध्ये दाखल होण्याचा अनुभव सांगितला. तसेच स्वत:चे समाजकार्य आणि लेखिका म्हणून मिळालेली ओळख याविषयी रंजक किस्से सांगितले.