नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. यामुळेच या परीक्षेत प्रत्येकाला यश मिळत नाही. परंतु असे काही उमेदवार आहेत ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आयएएस अधिकारी गरिमा अग्रवाल पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाल्या आहेत. गरिमा या मूळ मध्य प्रदेशातील खरगोन येथील आहेत. 29 वर्षीय गरिमा यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झाल्या, पण त्यांचे ध्येय आयएएस होण्याचे होते. यामुळेच त्यांनी पुन्हा तयारी केली आणि दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
सध्या गरिमा अग्रवाल या तेलंगणात प्रशिक्षणासाठी सहायक जिल्हा दंडाधिकारी म्हणून तैनात आहेत. गरिमा आयआयटी हैदराबादमधून पदवीधर आहेत. एका मुलाखतीत त्यांनी IIT ते IPS आणि नंतर IAS पर्यंतच्या प्रवासाची कहाणी सांगितली आहे.
– गरिमा पहिल्यापासून अभ्यासात हुशार
गरिमा यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर खरगोन येथून पूर्ण केले. नंतर आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा त्यांना 240 रॅंक मिळाली होती. मात्र, कमी रँकमुळे त्या आयएएस होऊ शकल्या नाहीत. यानंतर 2018 मध्ये त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी त्यांना भारतात 40 वी रॅंक मिळाली. त्यानंतर त्यांनी 2019-2020 मध्ये एलबीएस अकादमी, मसूरी येथे प्रशिक्षण पूर्ण केले.
– यशाचा मंत्र
गरिमा यांच्या म्हणण्यानुसार, UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूची तयारी वेगवेगळी न करता एकत्र केली पाहिजे. कारण पूर्व परीक्षेत येणारे प्रश्न मुख्य परीक्षेतही अनेक वेळा येतात. म्हणूनच रिवीजन करणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांनी वेळोवेळी मॉक टेस्टही देत राहावे. त्यामुळे वेग वाढतो आणि परीक्षेत कोणताही प्रश्न सुटत नाही.
– अपयशाने निराश होऊ नका
गरिमा यांच्या मते, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि सातत्य ठेवले पाहिजे. त्यामुळे मेहनत करत राहा, जर तुम्हाला पहिल्यांदा यश मिळाले नाही तर निराश न होता दुप्पट मेहनत करून तयारी करत रहा. या दरम्यान नकारात्मक ऊर्जा असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा, कारण अशा लोकांच्या जवळ राहणे तयारीवर परिणाम करते.