राजुरीत आतापर्यंत अनेक वाद निकाली
बेल्हे (वार्ताहर) – राजुरी (ता. जुन्नर) येथील तंटामुक्ती समितीने अनेक वर्षांपासून चालू असलेला वाद मिटवला.
याबाबत सविस्तर माहीती अशी की राजुरी येथील बाळशीराम मालुसकर, सीताराम मालुसकर यांचा भीमाजी मालुसकर, आशा रावबा मालुसकर, सुरेखा बापु बोरचटे यांचा अनेक वर्षांपासून जमिनीची वाद सुरु होता. या दोन्ही बाजूच्या दावा कोर्टात सुरु होता, तरीसुध्दा यांचा जमिनीचा वाद मिटत नव्हता. अखेर राजुरी गावात असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीकडे हा तंटा मिटवावा असा अर्ज करण्यात आला.
आज अखेर अनेक वर्षांपासून असलेला तंटा मिटवण्यात आला. येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या उपस्थितीत आणि माजी सभापती दीपक औटी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तंटा मिटवण्यात आला. यावेळी सरपंच एकनाथ शिंदे, माऊली शेळके, एम. डी. घंगाळे, जुबेदा जमादार, मुक्ताजी औटी, ऍड. शिवाजी आवटे, देवराम फावडे, सुदाम औटी, दिगंबर हाडवळे, नुरजहा पटेल, संजय वाघ, दत्तात्रय सरोदे, शौकत चौगुले, विनोद ताजवे उपस्थित होते. येथील तंटामुक्ती समितीने आतापर्यंत अनेक वर्षांपासून सुरु असलेले वाद मिटवले आहेत.