दमोह – अंधश्रद्धेची पातळी कुठपर्यंत घसरू शकते हे मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेनं समोर आलं आहे. अनेक लोक अंधश्रद्धेचे बळी पडतात. अशाच अंधश्रद्धेला बळी पडून दमोह जिल्ह्यातील महिलांनी धक्कादायक कृत्य केलंय.
दमोह जिल्ह्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शेतमाल धोक्यात आला आहे. यावर उपाय म्हणून येथील महिलांनी धार्मिक रुढी परंपरांना पुढं करत संतापजनक कृत्य केलं. मुलींना नग्न करुन गावभर फिरवल्यावर जोरदार पाऊस होतो, असा समज आहे. त्यानुसार महिलांनी अल्पवयीन मुलींना गावात विवस्त्र फिरवलं.
दमोह येथील महिलांनी एका बेडकाला दोरीने बांधून त्याल उलट टांगलं. त्यानंतर सहा मुलींना विवस्त्र करून गावात फिरविण्यात आलं. या घटनेनंतर येथील अंधश्रद्धेवर चहुबाजुने टीका होत आहे.
या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आयोगाने प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे घटनेचा विस्तृत अहवाल मागवला.