कोल्हापूर – राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थिनी वसतिगृहाला भविष्यात आणखीन एक मजला वाढविण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ, अशी घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली.
भास्कराचार्य प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या सहकार्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात राजमाता विजयाराजे सिंधिया विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
राज्यात कृषी अभ्यासक्रमाला 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थिनी प्रवेश घेतात ही चांगली बाब असून येत्या आठवड्यात राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सोयी-सुविधांचा आढावा घेण्याचा आपला मानस आहे.
राज्यात कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्यातील 30 टक्के योजना या केवळ महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आहेत. “रामेती’ प्रशिक्षण संस्थेला 3 कोटी रुपयांचा निधी देऊन तेथील अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सांगितले.