मुंबई – शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आजपासून राज्यातील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना 80 शिक्षक ऑनलाइन शिक्षण देणार आहेत. यासाठी राज्यातून 60 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल करोनाच्या संकटामुळे उशिरा लागला होता. त्यामुळे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासही उशीर झाला होता. प्रवेशाची पहिली ऑनलाइन फेरी पूर्ण झाली आहे.
मात्र पालकांपुढे फी वाढीचा सुद्धा मुद्दा आहे. राज्य सरकारच्या जीआर नंतरही काही शाळांनी फी वाढ केलीय यातच मागच्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. हाच मुद्दा घेऊन समन्वय समितीने आज राज ठाकरेंची भेट घेतली. विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज कृष्ण कुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
दरम्यान, यापूर्वीही जीम चालक, डब्बेवाले, मूर्तिकार आणि कोळी महिला राज ठाकरे यांची भेट घेतली होती.