रत्नागिरी – राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग कमी होताना दिसत नाही. काही जिल्ह्यांमध्ये तर करोनाने आणखी जोर पकडला आहे. हे लक्षात घेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात आला आहे. 1 ते 8 जुलै या काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाउन लावण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 8 जुलै या काळात लागू निर्बंध होणार आहेत. हा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून घेण्यात आला आहे,असेही त्यांनी सांगितले.