नाशिक – राज्यातील लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत आज पूर्ण होत आहे. असं असलं तरी राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच लॉक डाऊन येत्या ३१ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं होत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे आता राज्यभरात सध्या लागू असलेले सर्व निर्बंध ३१ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.
अशातच आता मुंबई, पुण्यानंतर कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेले नाशिक शहर ३१ जुलैपर्यंतचा लॉक डाऊन काटेकोरपणे पाळणार आहे. याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली असून सायंकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत लॉक डाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नाशिकमध्ये सायंकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी सदृश्य परिस्थिती असेल असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. नाशकातील कोरोना परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे उपस्थित होते.
Lockdown will be implemented in a stricter manner in Nashik from 7 pm to 5 am; it will be a curfew-like situation during this time: District Guardian Minister Chhagan Bhujbal
— Press Trust of India (@PTI_News) June 30, 2020